sunstick

 Sun Stick म्हणजे काय आहे ? 🔥🔥

🤷‍♂️सन स्टिक 6 प्रकारे काम करणारे एकमेव मार्केट मधील प्रॉडक्ट 
🛑जर घ्यायचे असेल तरच कॉल करावा व माहिती संपूर्ण वाचावी कॉल करण्याआधी 
🙋🏻‍♂️9604764194 = भारत कोकाटे 🙋🏻‍♂️
🔝🔝All Problems Solution🔝🔝

✅🌱सन स्टिक म्हणजे पाणी आणि मातीचा आत्मा...
👉हे एक चांगले प्रकारचे भू-सुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी  चांगल उपयोगी पडत.
कारण ज्या जमिनीचा ph हा 7.5 हुन जास्त झाल्याने पिकांना अन्यद्रव्य अपटेक करताना अडचणी येतात कारण त्या जमीन अल्काईन आहेत आणि sun stick मध्ये Hardness Reducer असल्याने जास्त झालेला ph कमी होतो व  पिके जमिनीतील अन्यद्रव्ये सहज उचलु शकतात....
सरासरी 1 लिटर/ एकरी  जमिनीत सोडावं त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
जमीन भुसभुशीत होते.

कॅल्शिअम सल्फेट....ज्या जमिनी मध्ये कॅल्शिअम कार्बोनेट (चुनखडी) जास्त असतो त्या जमिनी मध्ये Sun Stick वापरतात.
हे फक्त माती मध्ये वापरणे योग्य असते.
ज्या जमिनीचा pH (सामु) हा 7.5 पेक्षा म्हणजे जास्त,पण मुरमाड भुरख्या बरड जमिनी करीता sun stick वापरावे ...... पाणथळ,क्षारपड,खळगट....जमिनी मध्ये पाण्याचा निचरा होत नाही व जमिनी मध्ये आणि वरून दिलेल्या खतांचा पिकांना उपयोग न होता ते तसेच जमिनीत पडुन राहतात परिणामी जमिनीचे आरोग्य आणखी असंतुलित होते त्या ठिकाणी Sun Stick वापरावा.

Sun Stick मुळे जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण Sun Stick मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
बियाण्याची उगवण चांगली होते.
पाण्या सोबत येणारे क्षार Sun Stick मुळे कमी होतात.
जमिनीची धुप कमी होते कारण पिकांचे  मुळे जमिनीत खोलवर जातात.

पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.

जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियमचे प्रमाण सुधारते.
सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
सन स्टिक मुळे पिकाची अन्नद्रव्य  शोषण क्षमता वाढते.
सन स्टिक मुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते.
सन स्टिक मुळे पिकांना नव संजीवनी मिळते.
 कारण sun stick जमिनीत टाकल्या नंतर तो जेंव्हा पाण्याच्या संपर्कात येतो तेंव्हा त्यातील सिलिकॉन चे रूपांतर सलपुरीक ऍसिड मध्ये होते व जमिनीतील मॅग्नेशियम कार्बोनेट ,कॅल्शिअम कार्बोनेट हे सलफुरीक ऍसिड जाळून त्या पासून पिकांना कॅल्शियम उपलब्ध करून देते.

तो पिकांना आवश्यक असतो.
सन स्टिक मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी Sun Stick फायदेशीर आहे.
त्यामुळे माती कंद पिकाला चिटकत नाही.
Sun Stick मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
कारण त्यामध्ये सिलीसिलिकोंन आहे.
अशा प्रकारे Sun Stick चे विविध फायदे आहेत.
पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही.
कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे Sun Stick वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.आणि अश्या जमिनी मध्ये शेतकरी अज्ञानपोटी किंवा   अपुर्ण ज्ञाना मुळे फसतो कृषी केंद्र चालक त्यास पिकांना DAP, 10:26:26 15:15:15 00:24:24  असले रासायनिक खते टाकण्याचे सल्ले देतात.आणि शेतकरी बळी पडतो ज्या जमिनीचा PH 7.5 च्या पुढे आहे तिथे DAP सारखे 8.5 ph  असलेले रासायनिक खंत काहीच काम करणार नाही .....शेतकऱ्याला भौगोलिक समाधान मिळेल आणि जमीन अजुन खराब होईल.अपेक्षे प्रमाणे परिणाम नाही आला कि शेतकरी पुन्हा अजुन काहीतरी टाकणार पुन्हा ती जमीन अजुन जास्त खराब  होणार.....जमीन आपली काळी आई आहे. तीच आरोग्य जपणे आपलं आद्य कर्तव्य आहे. शेतकरी मित्रानो प्रत्येक पिक घेण्या पुर्वी जमिनीची आणि पाण्याची तपासणी करूनच खते आणि पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे ......पीक पाणी व्यवस्थापन हा खुप महत्वाचा मुद्दा आहे कारण खराब पाण्या मधुन टनाने क्षार जमिनी मध्ये जात असतात .....अतीतिरिक्त पाणी वापरणं म्हणजे मुळांच्या कक्षेतील खते खोलवर घालवणे .....

पिक निहाय कॅल्शियम कमतरतेची लक्षणे :-  

मका पिकात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नवीन पाने चिकटतात, पानांची वाढ चांगली होत नाही, तसेच नवीन पाने गुंडाळतात.
* टोमॅटो पिकाला फळांच्या वरच्या भागापासून तडा जातो व नंतर फळे काळी पडतात.
* भुईमूग या पिकात शेंगा पोकळ व लहान बनतात. शेंगांच्या आतून काळा पदार्थ निघतो. शेंगबिया व्यवस्थित भरत नाहीत.
* गाजर फळांवर खवले पडतात. गाजरे डागाळतात.
* बटाटा पिकात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे फळांच्या आतला भाग लालसर तपकिरी किंवा काळा होतो, तसेच साठवण क्षमता कमी होते.
* कोबीच्या आतील पानांच्या कडा जळतात. पाने कुजतात.
* फळांची प्रत कमी होते व फळे लवकर खराब होतात.

कॅल्शियम उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक -

१) जमिनीचा प्रकार - भरड्या व रेताड जमिनीत कॅल्शियमची कमतरता चिकणमाती किंवा पोयटायुक्त जमिनीपेक्षा जास्त असते. काळ्या जमिनीत इतर जमिनीच्या तुलनेत कॅल्शियम जास्त असते.

२) जमिनीचा सामू - आल्मधर्मी (सामू ६ पेक्षा कमी) असलेल्या जमिनीत ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. परिणामी, कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. तसेच अल्कधर्मी (सामू ८.५ पेक्षा अधिक) असलेल्या जमिनीत सोडियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते.

३) सेंद्रिय घटक - सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी असलेल्या जमिनीत कॅल्शियम मातीच्या कणांना चिकटून राहत नाही. त्याचे वहन होते.

४) कॅल्शियम व अन्य धनप्रभारित अन्नद्रव्यांचे गुणोत्तर ०.१०-०.२० इतके असेल तर हे पिकांसाठी चांगले व फायदेशीर असते. जमिनीत जर अमोनियम (NH4+), पोटॅशियम (K+), मॅग्नेशियम (Mg2+) आणि ॲल्युमिनियम (Al3+) चे प्रमाण अधिक असेल तर कॅल्शियमची जमिनीत व पर्यायाने पिकांमध्ये कमतरता निर्माण होते.

कॅल्शियमचा ऱ्हास  -

- अधिक पाऊस आणि अधिक सिंचन दिल्याने जमिनीतून कॅल्शियमचा ऱ्हास होतो.
- हलक्या जमिनी, आम्लयुक्त खतांच्या वापरामुळेही कॅल्शियमचा ऱ्हास होतो.

जमिनीत कॅल्शियम योग्य राखण्यासाठी उपाय -

१) सेंद्रिय घटकांचा वापर हलक्या व रेताड जमिनीत करावा.
२) कॅल्शियमयुक्त खतांचा वापर नायट्रेट नत्र असलेल्या खतांसोबत करावा. त्यामुळे दोन्हींचा कार्यक्षम वापर होतो.
३) आल्मधर्मी जमिनीत चुना आणि चोपण जमिनीत Sun Stick वापर करावा. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.

तक्ता -



फवारणीद्वारा वापर -

- फवारणीद्वारा कॅल्शियम पिकांना दिल्यास पिकांद्वारा लवकर शोषला जातो. शेंड्याकडील भागांना कॅल्शियम लवकर व मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो व पिकांची वाढ व पोषण चांगल्या प्रकारे होते.
- तसेच नत्रयुक्त खतासोबत कॅल्शियम दिल्यास (फवारणीद्वारा) पिकांची वाढ जोमाने होते.

कॅल्शियमचा इतर अन्नद्रव्यांसोबत परस्परसंबंध -

कॅल्शियम हे धनप्रभारित (Ca++) आयन असल्यामुळे इतर धनभार असलेल्या अन्नद्रव्यांसोबत शोषणासाठी स्पर्धा निर्माण होते. जसे सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, अमोनिअम, लोह आणि ॲल्युमिनिअम.

* सोडिअम - सोडिअमचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत मातीच्या कणांवरील कॅल्शियम सोडिअममुळे दूर लोटला जातो. परिणामी, कॅल्शियमचे विद्राव्य स्वरूपात जमिनीतून वहन होते व ऱ्हास होतो. सोडिअमचे प्रमाण अधिक झाल्यामुळे पिकांना सोडिअममुळे हानी होते. यामुळेच क्षारयुक्त व चोपण जमिनीत कॅल्शियम (Sun Stick) टाकला जातो.

* स्फुरद - जमिनीचा सामू ७ पेक्षा जास्त असेल तर मुक्त चुना मातीमध्ये जमा होतो. अशा स्वरूपातील उपलब्ध कॅल्शियम इतर अन्नद्रव्यांशी रासायनिक क्रिया करतो. स्फुरद ऋणप्रभारित आयन असल्यामुळे मुक्त चुना व स्फुरद यांच्यामध्ये रासायनिक क्रिया होते. पिकांना कॅल्शियम उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत स्फुरदाची उपलब्धता कमी होते.

* लोह आणि ॲल्युमिनियम - ज्या जमिनीचा सामू ७.० पेक्षा कमी असतो, अशा जमिनीत लोह आणि ॲल्युमिनियम उपलब्धता जास्त असते. त्यामुळे अशा जमिनीतील कॅल्शियमची उपलब्धता घटते.

* बोरॉन - ज्या जमिनीत व पिकांमध्ये कॅल्शियम प्रमाण जास्त असते, अशा जमिनीत पिकांमध्ये बोरॉनची उपलब्धता व शोषण यावरदेखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच बोरॉनची अति उपलब्धता किंवा कमतरता पिकांमध्ये व जमिनीत होऊ नये म्हणून कॅल्शियम फवारणी व जमिनीतून दिल्यास फायदा होतो.
संपर्क - 9604764194 भारत कोकाटे.

Comments

Popular posts from this blog

विक्रेत्याला काँटॅक्ट करून कसे फसावितात इतर ग्रूप वाले.

गाडी विकणे.

व्यवहाराच्या आधी हे वाचा.